Thursday 1 August 2019

विद्यार्थ्यांनी अभिव्यक्त होण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा - रविंद्र भैय्या पाटील


आज तंत्रज्ञानाने समाजातील विविध माध्यमे विद्यार्थ्यांना आपले मतप्रदर्शन करण्याकरीता व आपल्या साहित्यकृती लोकांपर्यंत पोहोचविण्याकरीता उपलब्ध झाली आहेत. त्याचा योग्य वापर करून अभिव्यक्त व्हावे व चांगल्या दर्जाची कलाकृती घडवावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र जळगावचे अध्यक्ष मा. रविंद्र भैय्या पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभात ते बोलत होते. भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयास नियतकालीक स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषीक मिळाले असून त्यानिमित्ताने विशेष समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप पाटील यांनी परीश्रम घेतले.




No comments:

Post a Comment