Thursday 21 March 2019

महाराष्ट्र निर्माण करण्याची क्षमता फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामध्येच होती


महाराष्ट्र निर्माण करण्याची क्षमता फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामध्येच होती
                                                                                                         - प्रा. राजेंद्र दास
 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर आणि श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजकारणा पेक्षा समाजकारणात त्यांनी जास्त लक्ष घातले. जातीच्या कोणत्याच कप्प्यात ते अडकले नाहीत. राजकारणाचा, सत्तेचा उपयोग सामान्यांना कसा होईल यावर त्यांचा भर होता. प्रशासन, शिक्षण, सहकार, ग्रामीण महाराष्ट्र, उद्योग व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रात ते महाराष्ट्राचा विकास पाहत होते त्याचबरोबर साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे त्यामुळे तरूण पिढीने यशवंतराव चव्हाण कोण होते हे जाणून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र दास यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ विचारवंत मनोहरपंत धोगडे व प्रमुख पाहुणे म्हणुन विभागीय केंद्राचे सदस्य राहुल शहा उपस्थित होते तसेच प्राचार्य पवार यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 








No comments:

Post a Comment