Tuesday 16 July 2019

नवलेखकांच्या लेखन, आशयावर संस्कार गरजेचे – वसंत भोसले


वारणा वार्षिक नियतकालिकास
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा नियतकालिक पुरस्कार

माणसाची जीवनशैलीच बदलत चालली असून जाणीवा, संवाद बदलत आहेत. आधुनिक साधनांचा उपयोग करणारी नवी संस्कृती तयार होत आहे. दर्जेदार लिकाणासाठी अभ्यासपूर्ण माहिती पुरवून आदर्श, नवीन मूल्य जपणारे, नवविचाराने प्रेरित असणारे साहित्य आणि साहित्यकार घडणे ही आजच्या काळाची गरज आहे. नवलेखकांच्या लिखाणावर, आशयावर संस्कार करण्याची गरज असून नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांना दर्जेदार लेखन लिहिण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन शिक्षकांच्या पुढे असल्याचे मत लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले.
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात वारणा वार्षिकनियतकालिकास मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा प्रथम पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात वसंत भोसले बोलत होते.
दत्ता बाळसराफ यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देऊन म्हणाले की, नवलेखकांची आजच्या समाजाचे वास्तव साहित्याच्या माध्यमातून मांडावे, गेल्या साठ-सत्तर वर्षांत देशाने खूप प्रगती केली असून सन २०१४ नंतरच प्रगती होत आहे हा गैरसमज पसरवत असल्याचे सांगितले. ऑनलाईनच्या जमान्यात ही माध्यमांनी समाजाच्या व राजकारणाच्या वास्तव घडामोडी समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन बाळसराफ यांनी केले. कार्यक्रमात दत्ता बाळसराफ, नवमहाराष्ट्र युवा अभियानचे राज्य संघटक नीलेश राऊत, सयोजक विजय कान्हेकर, वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. सुरेखा शहापुरे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी  नवमहाराष्ट्र युवा अभियानचे राज्य संघटक नीलेश राऊत यांनी प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धेची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी २०० हून अधिक नियतकालिक स्पर्धेतून वारणा, नियतकालिक स्पर्धेत प्रथक क्रमांक प्राप्त करून यशस्वी ठरल्याचे सांगितले.







No comments:

Post a Comment