Monday 15 July 2019

हवामान बदलाचे संकट रोखूया – चर्चासत्र

                                                                                                 
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे संकट समस्त मानवजात आणि पृथ्वीतलावरील सृष्टीला ग्रासून  टाकत आहे. स्वाभाविकपणे भारत आणि महाराष्ट्रही यातून सुटलेला नाही. आपण सर्व जण आपापल्या क्षमतेनुसार पर्यावरण संरक्षणाच्या कामात सक्रीय आहोत. जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच कटिबद्ध व्हायचं आहे. यासाठी आवश्यक लोकशिक्षण आणि कृती आराखडा राबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चर्चा  विनिमय करावा अशी कळकळीची विनंती आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबईच्या वतीने बुधवार दिनांक १७ जुलै, २०१९ रोजी सकाळी १०.३० ते सायं ५.३० यावेळेत वरील विषयांवर बैठक व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पूर्व नोंदणी आवश्यक ...संपर्क :- संगीता खरात ९९३०४०१३२९


No comments:

Post a Comment