Thursday 24 August 2017

'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण' परिसंवाद


औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात अध्यक्ष राज्य महिला आयोग श्रीमती विजया रहाटकर, राज्यप्रमुख अॅक्शन एड श्रीमती नीरजा भटनागर स्त्री अभ्यासक श्रीमती डॉ. वृषाली किन्हाळकर या मान्यवर मंडळी मार्गदर्शन करतील. 
दुष्काळ म्हटले की, सर्वांसमोर शेतकरी व त्याची स्थिती येते. याच बरोबर दुर्लक्षित राहतो तो समाजातील दुर्बल घटक. या घटकात सर्वाधिक शोषणाच्या बळी ठरतात त्या एकल महिला. संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत फिरताना सगळीकडे परितक्त्या विधवा व घटस्फोटीत महिलांचे मोठे प्रमाण आढळले. या महिलांना कोणत्याही प्रकारचा आधार कुटूंब आणि समाजव्यवस्थेकडून मिळत नाही, असे दिसून आले, यात पुन्हा भर पडली ती दुष्काळाची. या विषयाला घेऊन 'एकल महिला व पाणीप्रश्न' या विषयावर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाच्या अनुषंगाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवारी ९ सप्टेंबर २०१७ रोजी, दुपारी ४ वाजता, महसूल प्रबोधिनी सभागृह, दुध डेअरी सिग्नल जवळ अमरप्रीत चौक, औरंगाबाद येथे सुरू होईल. नंदकिशोर कागलीवाल (अध्यक्ष), सचिन मुळे (कोषाध्यक्ष), सुरेश शेळके (वि.अ.के) निलेश राऊत, विजय कान्हेकर, रेणुका कड, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर आणि सुबोध जाधव यांनी परिसंवादाचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment