Friday 17 November 2017

                                                                                     माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील
होणारे बदल शिकण्याची तयारी ठेवा - डॉ. अच्युत गोडबोले

सध्या जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. ते बदल शिकण्याची तयारी ठेवा अन्यथा त्या क्षेत्रातून तूम्ही बाहेर फेकला जाऊ शकता असं मत संगणक तज्ज्ञ संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी काल-आज-उद्या' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत एकविसावे पुष्प, संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांचे 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी काल-आज-उद्या' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला त्यांनी माहिती तंत्रज्ञान काय आहे हे गोडबोले यांनी विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले. त्यानंतर पुढील २० वर्षांत काय बदल होईल हे सांगू शकत असेही ते म्हणाले. १९६०, १९७०, १९८० आणि १९९० या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कसे बदल झाले आणि त्याचे परिणाम काय झाले या विषयावर सुध्दा त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले.
खासकरून त्यांनी १९८० च्या काळात घडलेल्या या गोष्टी सांगितल्या, पर्सनल संगणक तयार झाला तो ही कमी आकाराचा, त्यानंतर तो घरोघरी दिसायला लागला. माऊस आला आणि त्यानंतर लोकांचा संगणकावरचा विश्वास वाढला. 

No comments:

Post a Comment