Monday, 24 June 2019

राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा सर्वसमावेशक,प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे : डॉ.वसंत काळपांडे

राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा सर्वसमावेशक,प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे : डॉ.वसंत काळपांडे



औरंगाबाद : दि.२३ – केंद्र शासनाच्या वतीने चर्चा व सूचनेसाठी जाहीर करण्यात आलेला राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा हा सर्वसमावेशक व शिक्षण प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचा विचार करून बनवलेला असून,त्यावर कुठल्याच एका राजकीय विचारप्रक्रियेची छाप नाही,हे त्याचे वेगळेपण आहे.वंचित घटक,विशेष व्यक्ती,तृतीयपंथी या सगळ्या सामाजिक घटकांना शैक्षणिक प्रक्रियेत सामावून घेण्याचा विचार यात मांडण्यात आला आहे.यातील तरतुदींचा अभ्यास करून केंद्र शासनाला आपण वैयक्तिक पातळीवर देखील सूचना पाठवू शकतो.तीस जून ही सूचना पाठविण्याची शेवटची तारीख आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक व शिक्षण विकास मंचाचे संयोजक डॉ.वसंत काळपांडे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई – विभागीय केंद्र औरंगाबाद,महात्मा गांधी मिशन,शिक्षण विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते.याप्रसंगी विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.बी.बी.चव्हाण,प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ,केंद्राचे कार्यकारिणी सदस्य डॉ.श्रीरंग देशपांडे,डॉ.अपर्णा कक्कड,डॉ,अनुया दळवी,साधना शाह यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ.बी.बी.चव्हाण यांनी शिक्षण धोरण कायदा २०१९ च्या महत्वाच्या तरतुदींचे विस्तृत सादरीकरण केले.या चर्चासत्रात शंभरहून अधिक मुख्याध्यापक,प्राचार्य,संस्थाचालक,शिक्षक,प्राध्यापक,बाल मनोचिकीत्सक,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,पालक यांनी सहभाग नोंदवला.सादरीकरण झाल्यानंतर सर्व उपस्थित प्रतिनिधींनी आपल्या सूचना व अभिप्राय व्यक्त केले

या धोरणात वय वर्ष ३ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या प्रगतीबद्दल तरतुदी करण्यात आलेल्या आहे,त्यात प्रामुख्याने पूर्वप्राथमिक वयोगटाचा समावेश हा आरटीई मध्ये करणे,शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदलून तो पूर्वप्राथमिक गटापासून सुरु तयार करणे.राष्ट्रीय व राज्य शिक्षण आयोगाची स्थापना,बी एड चा अभ्यासक्रम दोन व चार वर्षांचा करणे अशा अनेक बाबींचा समावेश आहे.नर्सरी ते पदव्युत्तर शिक्षणाचा विचार यात करण्यात आलेला आहे.आठवीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विषयांची निवड करता येणार आहे,म्हणजेच विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान बरोबर नाट्य अथवा नृत्यकला शिकता येईल.अशा अनेक तरतुदी असलेल्या या धोरणाच्या मसुद्याचा अभ्यास करून केंद्र शासनाला तीस जूनच्या आत आपणास आपल्या सूचना व अभिप्रायnep.edu@nic.com या ईमेल आयडीवर पाठविता येतील.

या चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत,सुबोध जाधव,दीपक जाधव,रुपेश मोरे,राजेंद्र वाळके,प्रवीण देशमुख,त्रिशूल कुलकर्णी,श्रीकांत देशपांडे,महेश अचिंतलवार,विनोद सिनकर,उमेश राऊत आदींनी परिश्रम घेतले.

Sunday, 23 June 2019

विज्ञानगंगाचे एकोणचाळीसावे पुष्प ‘बहुपयोगी गणित’ संपन्न..




विज्ञानगंगाचे एकोणचाळीसावे पुष्प ‘बहुपयोगी गणित’ संपन्न..
संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.








यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत एकोणचाळीसावे ‘बहुपयोगी गणित’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यांते डॉ. विवेक पाटकर यांनी या विषयावर बोलताना गणित पदोपदी आपण उपयोग करीत असतो. अभिजात गणित व त्यांचे उपयोग, नवीन गणित व नविन उपयोग, नवीन प्रश्न व नवीन गणित अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी उदाहरण देऊन विज्ञानप्रेमींना सांगितले. तसेच विज्ञानप्रेमीच्या प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. आपण ह्या व्याख्यानाचे फेसबुक लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/392559764692937/संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Wednesday, 19 June 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित करिअर मार्गदर्शन व्याख्यान...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे दहावी व बारावी नंतरचं नवं क्षितीज’ या विषयावर प्रा. संदीप नेमळेकर यांचे करिअर मार्गदर्शन व्याख्यान शुक्रवार २१ जून २०१९ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत स्टर्लिंग काँलेज हाँल, नेरुळ येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.

नवीन शैक्षणिक धोरण मसुदा - २०१९ विषयावर चर्चासत्राचे आयोजन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी मिशन व शिक्षण विकास मंच यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण मसुदा- २०१९ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन रविवार दि. २३ जून २०१९ रोजी करण्यात आलेले आहे. जेएनईसी महाविद्यालयात सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान हे चर्चासत्र संपन्न होईल. शिक्षणतज्ज्ञ आणि मुख्य संयोजक डॉ. वसंतराव काळपांडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. बी.बी.चव्हाण, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुभाष कांबळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सुरजप्रसाद जैस्वाल, विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्रयोगशील शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अभ्यासक, पालक, पत्रकार या चर्चेत सहभाग नोंदवणार आहे.
या नवीन शैक्षणिक धोरणातील चांगल्या तरतुदी कोणत्या आहेत? कोणत्या तरतूदीचा अजून अंतर्भाव यात असावा? कोणत्या तरतूदी बरोबर नाहीत त्यात काय बदल व्हावा? यासंदर्भात या चर्चेत विचार व्यक्त केले जाणार आहे. तसेच या चर्चेत अंतिम झालेल्या मुद्दांचा गोषवारा केंद्र शासनाला या धोरणाच्या मसुद्याबाबतचा अभिप्राय म्हणून कळविला जाणार आहे. या चर्चासत्रात सहभाग मर्यादीत व निःशुल्क असून केवळ नोंदणी करणार्‍या प्रतिनिधींनाच सहभागी होता येणार आहे. नोंदणीसाठी ०२४०-२३५१७७९ अथवा ९८२३०६७८७९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मूळे, सचिव नीलेश राऊत, सदस्य डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, प्रा.दासू वैद्य, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.अपर्णा कक्कड, बिजली देशमुख, डॉ.रेखा शेळके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, रेणुका कड, विनोद सिनकर, रुपेश मोरे, राजेंद्र वाळके आदींनी केले आहे.



Monday, 17 June 2019

‘नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९’ चर्चासत्र संपन्न...

शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंचच्या वतीने चर्चासत्र नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. या विषयाच्या अनुषंगाने बसंती रॉय यांनी प्रेझेंटेशन सादर केले. शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या तृटी आहेत, तसेच कोणत्या गोष्टी होणं गरजेच आहे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक विकास मंचाचे संयोजक वसंत काळपांडे, दत्ता बाळसराफ , राज्यभरातील वेगवेगळ्या शाळा  कॉलेज आणि  संस्थांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.













‘हिंदू विवाह कायदा.. एक आढावा’ व्याख्यानाचे आयोजन…

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरम आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आपला कायदा जाणून घ्याव्याख्यानमाले अंतर्गत हिंदू विवाह कायदा.. एक आढावाया विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. जे. बी. पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते. हिंदू विवाह कायदा कोणाला लागू पडतो, त्याचा उद्देश काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिली.
हिंदू विवाह कायदा , त्याअंतर्गत येणाऱ्या गोष्टी, घटस्फोट याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. शेवटी प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.










सुखदा बेहेरे- दीक्षित यांच्या स्वरांच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध...


सूरविश्वास
पं. कुमार गंधर्व यांच्या सुरांचे स्मरण, पं. वसंतराव देशपांडे यांची विलक्षण गायकी यांची आठवण करून देणारी सुरमयी सकाळ आणि आपल्या स्वतंत्र शैलीचा गायनाविष्कार सादर करून सुखदा बेहेरे-दीक्षित यांनी सूर विश्वासची कोवळ्या स्वरांची सोनेरी रिमझिम आनंददायी केली. नव्या पिढीतील गायिका  सुखदा बेहेरे-दीक्षित यांच्या गायनाचे पाचवे पुष्प गुंफले गेले. हर्षद वडजे (हार्मोनियम), गौरव तांबे (तबला) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.
नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वासहा अनोखा उपक्रम विश्वास गृप तर्फे सुरू करण्यात आला आहे. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
नाट्यसंगीतातील गाजलेले पं. वसंतराव देशपांडे यांचे या भवनातील गीत पुरानेनाट्य परंपरेची आठवण करून देणारे होते. पं. कुमार गंधर्व यांचे एक सुर चराचर छायेतून निर्गुण भक्तीचा अनुभव भक्तीमय करून गेला.
याप्रसंगी पं. मकरंद हिंगणे, विराज रानडे, विश्वास ठाकूर यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. मनोज शिंपी, राजाभाऊ मोगल, रमेश देशमुख, मिलींद धटिंगण, प्रितम नाकील, स्वाती राजवाडे, डॉ. गिरीष वालावलकर, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. विनायक देवधर, मंजुषा चिमोटे, अनिल ओढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.