यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
जिल्हा केंद्र ठाणे तर्फे राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांनी
वेणूताईंना लिहिलेल्या पत्रांच्या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रांचे
अभिवाचन डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे आणि मकरंद सावंत सादर करणार आहेत. रविवार दिनांक
१५ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता, ठाणे नगर वाचन मंदिर, टेंभीनाका, ठाणे
(पश्चिम) येथे विनामूल्य हा कार्यक्रम पार पडणार आहे.
No comments:
Post a Comment