Saturday 3 February 2018

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता एक दिवसीय कार्यशाळा....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. ही चर्चा प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात शनिवारी १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत होईल.
विशेष म्हणजे या परिसंवादात प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. सुप्रिया सुळे यांच्यासह विषयांवर काम करणारे अभ्यासक, तसेच शासकीय प्रतिनिधी इत्यादी मान्यवर परिसंवादाला उपस्थित राहणार आहेत.
१३ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ह्या परिसंवादामध्ये तृतीयपंथी महिला आणि त्यांच्या समस्या याविषयी चर्चा करण्यात आली होती. या सर्व चर्चेमधून एक समान सूर समोर आला तो म्हणजे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आखणी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सदर विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून नोंदणी आवश्यक आहे. संपर्क- मनिषा खिल्लारे ७०२०२९९६७७

No comments:

Post a Comment