Friday 4 May 2018

महाराष्ट्राची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या कौशल्यामुळे झाली – प्रा. राजेंद्र दास

यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेहमीच भारत सेवक महाराष्ट्र म्हणून मानले स्व. प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांनी संघर्ष उभा केला आणि १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर देखील राज्याची निर्मिती अवघड झाली होती, तेव्हा चव्हाण साहेब सुध्दा अस्वस्थ झाले होते. हा जनभोक्ष दिल्लीकरांना समजला पाहिजे म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंडीत जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बोलवले आणि महाराष्ट्राच्या निर्मितीचा तो जनभोक्ष आणि तीव्र भावना पाहून पंडीत नेहरूंनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीला १ मे १९६० रोजी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची निर्मिती आणि समकालीन समस्या या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. राजेंद्र दास यांनी आपले विचार मांडले.

यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न, समृध्द आणि अत्यंत कल्पकतेने उभा केला. यासाठी सहकार, शेती आणि उधोग हे तीनही क्षेत्र अव्वलस्थानी राहील. यासाठी विशेष काळजी घेतली आणि हे तीनही क्षेत्र समृध्द होण्यासाठी शिक्षण क्षेत्र देखील समृध्द झाले पाहिजे, म्हणून सिक्षण समाजातील सर्व घटकांना मिळले पाहिजे, म्हणून विशेष काळजी घेतली एवठ्या विशाल विचारांचे चव्हाण साहेब होते. हे करत असताना राजकारणात त्यांनी मानापानापेक्षाही राज्याचे सार्वजनिक हित म्हत्वाचे मानले. म्हणूनच राज्य मराठ्यांचे कि मराठीचे असा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा हे राज्य बहुजनांचे असे उत्तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले. म्हणुनच आजही राज्याच्या आणि देशाच्या गर्भकाळात यशवंतराव चव्हाण यांचे विचार जिवंत आहेत
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार युनुसभाई शेख होते. तर स्वागत व प्रस्तविक विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड यांनी केले. जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय केंद्राचे सदस्य माजी खासदार धर्मणा सादूल यांची प्रमुख उपस्थिती होती. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सपन्न झालेल्या या कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment