Monday 2 April 2018

तृतीयपंथींचा कार्यक्रम उत्साहात साजरा.

अनाम प्रेम, शोधना कन्सटन्सी, वॉटरइड इंडिया, अपंग हक्क विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथींसाठी जीवनमान सुधारणा आणि सुलभ स्वच्छता या विषयावरती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला देशभरातून तृतीयपंथी आले होते.
कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कृपाली बिडये यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक समीर घोष यांनी केले. क्लेमेंट चाऊवेट यांनी जीवनमान सुधारणा याबाबत तृतीयपंथी समुदायाला मार्गदर्शन केले.
अभिना अहेर, विद्या राजपूत, सोबिन कुरिआकोसे इत्यादी मान्यवरांनी स्वतंत्र शौचालय याबाबत तृतीयपंथी समुदायाला मार्गदर्शन केले. तसेच विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली.

No comments:

Post a Comment