Sunday 1 April 2018

अशोक शहाणे यांचे 'विद्रोह आख्यान'

संस्कृतमधून अभिव्यक्तीच्या मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा जन्मास आली. ज्ञानेश्वरांचे ‘अमृतातेही पैजा जिंके’ हे म्हणणे संस्कृतला उद्देशूनच होते; मात्र त्याबद्दल कुणी अवाक्षरही काढत नाही. त्या काळात संस्कृतमधून व्यक्त होण्याला मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा निपजली आणि याचे दाखले चक्रधरांच्या लीळाचरित्रातही आढळतात, असे रोखठोक प्रतिपादन संस्कृतीविषयक ज्येष्ठ भाष्यकार, लघुअनियतकालिकांचे अध्वर्यू अशोक शहाणे यांनी केले. आपल्याकडे भाषा शिकवण्याकडे अनास्था असल्याचे सांगत शहाणे यांनी भाषाशिक्षण गांभीर्याने होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. केवळ मराठी  भाषा शिकवणाऱ्या शाळा स्थापन करायला हव्यात, अशी सूचनाही त्यांनी या वेळी मांडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे आणि ‘साद’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहाणे यांचे ‘आख्यान’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी साहित्य, लघुअनियतकालिके, भाषा, अनुवादप्रक्रिया आदी विषयांवर शहाणे यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला.

No comments:

Post a Comment