Friday 21 July 2017

'विज्ञानगंगा'चे सतरावे पुष्प संपन्न

'विज्ञानगंगा'चे सतरावे पुष्प संपन्न 


'
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सतरावे पुष्प 'चिरतारुण्य' या विषयावर टीआयएफआरमधील शास्त्रज्ञ डॉ. उल्लास कोलथुर यांनी चव्हाण सेंटरमध्ये उपस्थितांना चिरतारुण्य जपण्याबाबत मार्गदर्शन केले.
आपलं आयुष्य जेवढं आहे तेवढं चांगलं जगू असं बोलून कोलथुर यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. नंतर ते माणसाच्याच नव्हे, तर समस्त प्राणीसृष्टीच्या शरीरातील चिरतारुण्याला चैतन्य देण्याची क्षमता नेमकी कुठे दडली आहे, त्याचे रहस्य काय आहे याबाबत मार्गदर्शन केले.
सर्व सजीवांमध्ये आढळणाऱ्या चिरतारुण्याच्या जनुकास सक्रिय करण्याची क्षमता निश्चितपणे कोणत्या क्षेत्रात आहे, हेही उपस्थितांना पटवून दिले. तूमचं शरीर म्हणजे एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये अनेक मशींन्स आहेत. लागेलं तितकाच पौष्टिक आहार घ्या. जितकं शरीर चांगलं ठेवालं तितकं चांगलं आयुष्य जगालं असे ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment