Sunday 21 October 2018

चूकीच्या पध्दतीने शेती केल्याने शेतीचं वाटोळं झालं...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत एकतिसावे पुष्प व्याख्याते डॉ. आनंद कर्वे यांचे 'आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी' या विषयावरील व्याख्यान नुकतेच चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट येथे संपन्न झाले.

कार्यक्रमाला काही शेती जाणकार आणि शेतीविषयी अनभिज्ञ असलेली मंडळी हजर होती. कर्वे यांनी पिके कशा पद्धतीने घ्यावी, त्याचं नियोजन कसे करावे, कीटकनाशक फवारणी केव्हां करावी, एकाचवेळी दोन पिकं कशी घ्यावी आणि परदेशात कशी पिकं घेतली जातात इत्यादी मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दोन पिके कशी घेतली जातात, याबाबत त्यांनी जपानचं उदाहरण दिलं. जपानमध्ये भाताच्या पिकासोबत गव्हाचं पीकं घेतलं जातं. भाताची पेरणी झाल्यानंतर महिनाभरात गहू पेरला जातो. गव्हामुळे तण अजिबात उगवत नाही आणि भाताचं पिकं काढल्यानंतर महिनाभरात गव्हाचंही पीक काढलं जातं असं त्यांनी सांगितलं. 

No comments:

Post a Comment