Thursday 1 August 2019

साहित्य हे माणुस म्हणून जगण्याची प्रेरणा देते - प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर



विद्यार्थ्यांनी आपल्या लिखानात सहजता आणावी, त्यामुळे ते लोकांचे लिखाण होईल, सर्वसामान्यांना त्यांचे वाटेल. त्यासाठी लिखाणाचे तंत्र देखील समजून घ्यायला हवे, याकरीता पुस्तके आपली मित्र बनवा. साहित्य हे तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते. जे विद्यार्थी आता विविध प्रकारे अभिव्यक्त होत असतील, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! व पुढील काळात यांच्यातूनच साहित्याच्या नव्या प्रवाहांची निर्मिती व्हावी, असे मत प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभात ते बोलत होते. नागपूर येथील कमला नेहरू कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स या महाविद्यालयास नियतकालीक स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषीक मिळाले असून त्यानिमित्ताने विशेष समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मा. सुहासिनी वंजारी यांची उपस्थिती होती. तर प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक मा. दत्ता बाळसराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कांबळे, उपप्राचार्य डॉ. प्रदिप दहीकर, अंकाचे संपादक सिद्धेश देव, सुहास तेंडुलकर, निशिकांत काशीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक नीलेश राऊत व अभिजीत राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती होती.








No comments:

Post a Comment