Saturday 4 March 2017

शरद पवारांनी जपला मैत्रीचा ओलावा – कवीवर्य ना. धो. महानोर









आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग कविता आणि ललित लेखनाने सा-या महाराष्ट्राला वेड लावलेल्या या रसिकप्रिय सुप्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचा अमृत महोत्सवा निमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कृतज्ञता सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम ४ मार्चला सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईमध्ये संपन्न झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये कवी महानोर यांच्या जीवनाचा आतापर्यंतचा प्रवास फोटो व चलचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला.

कार्यक्रमाचे निवेदन गोपाळ अवटी आणि प्रज्ञा सागडे यांनी मोजक्या शब्दात करून उपस्थिताची मने जिंकली. कार्यक्रमाला सुप्रियाताई सुळे, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, जब्बार पटेल, रामदास भटकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरूवातीला या कार्यक्रमाचे महानोर यांच्या कवितेचे अभिवाचन श्रीरंग देशमुख, अमृता मोरे, हेमंत टकले आणि दत्ता बाळसराफ यांनी केले. त्यानंतर रामदास भटकळ यांनी त्यांच्या आयुष्यात बदल करणारे महानोर कवींचा जीवनपट रसिकांसमोर उलघडला. लेखनाच्या आणि शेतीसारख्या आवडत्या विषयाच्या आठवणी जागवत साजरा महोत्सव साजरा करावा, अशी कल्पना असून हा केवळ सत्काराचा औपचारिक कार्यक्रम न करता त्यानिमित्ताने महानोरांच्या लेखणीतून उतरलेली शब्दशिल्पे जिवंत व्हावीत, असा प्रतिष्ठानचा विचार आहे. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. मुख्यत: सांस्कृतिक स्वरूपाच्या या कार्यक्रमात महानोरांचं वेगळेपण सांगणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारी किंवा त्यांच्या साहित्याचे रसग्रहण करणारी काही मनोगतं दृकश्राव्य स्वरुपात सादरीकरण करण्यात आली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी कवीच्या लहान पणापासूनची आतापर्यंत असलेले संबंध काही मोजक्या शब्दात मांडले. त्यामध्ये शेती, आमदार, प्रश्न मांडण्याचे कौशल्य, शेतकरी दिंडी या विषयांच्या आठवणी ताज्या करून दिल्या. त्यानंतर कवी महानोर यांनी केलेल्या सत्काराला भारावून गेलो आहे असे सांगून भाषनाला सुरूवात केली. त्यांचे यशवंतराव चव्हाण यांच्याशी असलेले संबंधाशी त्याच्या कवीच्या अदाकारीत ओळख सांगितली. पवार साहेबांवर नेहमी सारखे गमंतीशीर किस्से त्यांनी सांगून पत्र वाचनाला सुरूवात केली. कार्यक्रमाचा शेवट त्यांच्या कवीतेने केला...

No comments:

Post a Comment