Wednesday 15 March 2017

हरवत चाललेला संवाद धोकादायक...

हरवत चाललेला संवाद धोकादायक...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागातर्फे 'आपली बदलती संस्कृती' या विषयावर व्याख्यान ११ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉ. अनिल अवचट व्याख्यानात आपल्या सभोवतालच्या समाजामध्ये आत्मसंतुष्टपणा वाढल्याने जगण्यात पोकळी निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या अप्पलपोटी संस्कृतीमुळे जीवनातील संवाद हरवत चालला असल्याचे मत डॉ. अनिल अवचट यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'आपली बदलती संस्कृती' या विषयावर बोलताना व्यक्त केले.

विश्वास लॉन्स परिसरातील डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानात पुढे बोलताना डॉ. अवचट यांनी खुंटत चाललेला संवाद रोखण्यासाठी माणुसकीचं नातं बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. फेसबुक, व्हॉट्स अॅप यांसारख्या समाज माध्यमांमुळे निर्माण होणा-या आभासी जगात माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत, तसेच समाजाची योग्य जडणघडण होतानादेखील दिसत नसल्याचे सांगताना अवचट यांनी पर्यावरणाचा -हास थांबविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विश्वास ठाकूर यांनी केले.

No comments:

Post a Comment