Wednesday 12 October 2016

कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत

राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा...
माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला दि. २२ फेब्रवारी २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सलग ५० वर्षे राज्याच्या व देशाच्या कायदेमंडळात सदस्य असलेले शरद पवार हे एकमेव नेते आहेत. राज्य व केंद्रात विविध मंत्रिपदे आणि अनेक संस्थांची धुरा यशस्वीपणाने हाताळणा-या मा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या विषयी अधिक माहिती डाऊनलोड करा 

http://ycpmumbai.com/images/pdf/vaktrutva_spardha2016.pdf

माजी केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या संसदीय कारकीर्दीस 22 फेब्रुवारी 2017 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. या पाच दशकांमध्ये पवार साहेबांच्या हस्ते अनेकविध निर्णय झाले. अनेक प्रकल्प उभे राहिले. आदरणीय पवार साहेबांचे हे विचार आणि कार्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावर या स्पर्धा घेण्यात येणार आहे. सोबतच्या माहितीपत्रकांत शालेय निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यांची सविस्तर माहिती दिली आहे. अधिकाधिक विद्यार्थी आणि युवांनी यात आपला सहभाग नोंदवावा.

http://ycpmumbai.com/images/pdf/nibhandh_spardha2016.pdf

No comments:

Post a Comment