Monday 15 October 2018

वंचित बालकांचे हक्क विकासाच्या केंद्रस्थानी असावेत - भाल कोरगावकर

सोलापूर : वंचित बालकांचे हक्क विकासाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. वंचित मुलांच्या शाश्वत पुनर्वसनासाठी समाज व शासन सक्रीय पुढाकार घ्यावा असे आवाहन भाल कोरगावकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर, आपलं घर बालगृह, वालचंद कला वा शस्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपलं घरच्या रौप्यमहोत्सवानिमित्त "वंचित मुले व समाज" या विषयावर एकदिवसीय परिसंवादात आयोजीत करण्यात आला होता. बीजभाषण करताना ते पुढे म्हणाले कि, पोषण आहार व बालशिक्षण हा भारतीय बालकांच्या संदर्भात जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. सारे जग अक्षर साक्षरता साध्य करून डिजीटल साक्षरतेकडे वाटचाल करताना भारतातील मुले मुलभूत हक्कांपासून वंचित आहेत. बालपण निर्देशांकात ब्रिक्स देशांत भारताचा सर्वात शेवटचा क्रमांक आहे. वंचित मुलांचा प्रश्न समाजाच्या दया व सहानुभूतीवर अवलंबून न ठेवता कायद्यानेच शाश्वत पुनर्वसन करण्याकरिता शासनाने पावले उचलली पाहिजेत असे प्रतिपादन भाल कोरगावकर यांनी केले.

             या परिसंवादाचे उद्घाटन शुभांगी बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोष कोटी होते. तर विचारमंचावर साथी पन्नालाल सुराणा, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्रा.डॉ.अबोली सुलाखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. युवकांच्या सहभागानेच वंचित मुलांचा प्रश्न सुटू शकेल व भविष्यात पाखर सारख्या संस्थांची गरज राहू नये अशी अपेक्षा शुभांगी बुवा यांनी यावेळी व्यक्त केली.

प्राचार्य. डॉ. संतोष कोटी म्हणाले कि समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही महिने वंचित बालकांसाठी काम करणाऱ्यांनी संस्थेत विनामुल्य काम करावे. किल्लारी भूकंपात अनाथ झालेल्या बालकांचे बालकत्वाची जबाबदारी भाई पन्नालाल सुराणा व आपलं घरणे घेतली सदर प्रकल्प उभारणीसाठी मा. शरद पवार साहेबांनी मोलाची भूमिका बजावली आहे. व यास त्यांचा खारीचा वाटा आहे, हे ऐतिहासिक व अभिनंदनीय समाजकार्य आहे. आदिवासी समाजात एकही अनाथ बालक आढळत नाही. मात्र सुशिक्षित समाजातील वंचित व अनाथ बालकांची संख्या समाजाच्या सुसंस्कृतपणावर प्रश्न निर्माण करते असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. कोटी यांनी केले. उद्घाटनाच्या सत्रात प्रा. डॉ. अबोली सुलाखे यांनी वंचितांच्या पुनर्वसनात संगीताचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. संगीत मनोरंजनासोबत जीवन जगण्याचा आधार मिळवून देते असे त्या म्हणाल्या. उद्घाटन सोहळ्याची प्रस्तावना साठी पन्नालाल सुराणा यांनी केली व आपलं घरच्या स्थापना व रौप्य महोत्सवी वाटचालीला आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अभय जाधव व प्रा. श्रीकांत धारूरकर यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश ठाकूर यांनी केले.

                 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभागतीत सर्व प्राध्यापक. डॉ. इंदिरा चौधरी, डॉ. निशा वाघमारे, डॉ.विजया महाजन, डॉ.संदीप जगदाळे, डॉ.जितेंद्र गांधी व डॉ.अभय जाधव आणि समाजकार्य विद्यार्थी स्वयसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment