Tuesday 19 December 2017

'विज्ञानगंगा'चे बाविसावे पुष्प संपन्न ..











यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत बाविसावे पुष्प डॉ. समीर देशपांडे यांचे ‘भारतीय सोशल मार्केटींगचे’ प्रश्न सोडविण्यासाठी सात युक्त्या या विषयावर यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी पार पडले.
सुरुवातीला डॉ. समीर देशपांडे यांनी भारतीय सोशल मार्केटींग म्हणजे नेमके काय आणि त्याचे फायदे आणि तोटे उपस्थितांना समजावून सांगितले. त्यानंतर देशपांडे यांनी उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण कशा पध्दतीने केले पाहिजे हे उदाहरणासहित स्पष्ट करून सांगितले. सध्याच्या घडीला भारतीय सोशल मार्केट मधील तंबाकू आणि अल्कोहोल यांची सुद्धा उदाहरणं देऊन उपस्थितांची मनं जिंकली.

No comments:

Post a Comment