Tuesday 3 January 2017

महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे " स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र " व्याख्यान संपन्न..



आजच्या घडीला स्त्री 'नोकरी' आणि 'कुटुंब' या दोन्ही तुल्यबळ बाजू हाताळत असताना स्वयंपाक घरातील रसायन शास्त्र तसेच आरोग्याची काळजी याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या रेखा रानडे दिवेकर यांनी सुरुवातीला रसायन शब्दाचे स्पष्टीकरण दिले. रसा मध्ये पृथ्वी म्हणजे रस पूर्ण विश्व म्हणजे रसायनचा समूह आहे. प्रत्येक व्यक्तीच रसायन वेगळ आहे. बाहेरची रसायन घ्यायला नकोत. ते आपल्या आजूबाजूला असतात..

मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये स्वयंपाक करत असताना आपण पूर्वी वापरत असलेली लोखंडी भांडी वापरल्यास आपले शरीर अधिक संतुष्ट राहील असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. नेहमी आपण आहारामध्ये भात खायला हवा, आणि सर्व प्रकारच्या डाळी आपण नियमित खाव्यात. "सदृढ़  शरीरासाठी नाचणी नियमित केली तर अति उत्तम"  अशा त्या म्हणाल्या. तूप हे बुध्दी आणि आरोग्यासाठी चांगले आहे. तर सध्या जेवणात वापरत असलेल्या तेलाची जाहिरात अधिक प्रमाणात करण्यात येत आहे, त्यापासून सावध राहून फिलटर केलेले तेल फक्त वापरावे अशा विविध विषयावरील टिप्स त्यांनी महिलांना दिल्या. या मार्गदर्शनासाठी  महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद होता.

No comments:

Post a Comment